Sunday, February 21, 2010

बारावीची परीक्षा.........

बारावीच्या परीक्षेला दोन दिवस उरलेत फक्त... (आणि माझे हे असे कीड़े चलालेयत ) असो...... तर ह्यावेळी अजिबातच टेंशन आलेले नाहिये आम्हाला आणि त्यामुळे त्याचीच चिंता वाटतेय , की कित्ती कूल आहोत आपण ( खरेतर ठंड , मख्ख वैगरे)

बोर्डाची परीक्षा असल्यासारखे वाटतच नाहीये ..दहावीच्या वेळी कसले Hyper झालो होतो आपण वैगरे वैगरे आठवून कसेनुसे होते...

काय होणार आमचे देव च जाणे ( इति बारावी विद्यार्थी सम दुखी आई परिषद् )

पण खरय काय होणारे देवालाच ठाउक.... ह्या वेळी तरी सगळे नीट पार पडून देत ... दहावीच्या वेळी जसा गोंधळ झाला तसे काहीही न होता निदान आत्ता तरी चांगल्या कॉलेज मध्ये Admission मिळो.....

SO थोडक्यात I really really need Best wishes for exam and specially for the period after our results......

Friday, February 5, 2010

गांधी घराण्याच्या चपला

नवीन पिढी - नवीन चपला - आणि लाळघोटे पणा करणारे आपले नव नवीन मंत्री....
आजच राहुल गांधीचे बूट उचलून आपले गृह राज्य मंत्री रमेश बागवे यांनी 'सुहाने कल की यांदे' जागवली...
ग्यानी झेलसिंह यांनी इंदिरा गांधींच्या चपला उचलण्याची तयारी दाखवली होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीयुत शंकर राव चव्हाण यांनी संजीव गांधींच्या चपला उचलल्या...
अरे काय ???? गांधी काय राजे आहेत का देशाचे??? कित्ती हा लाळ घोटे पणा..... इतकी गुलामी वृत्ती....का? कशासाठी? पदासाठी? स्वाभिमान, आत्म सन्मान सगळे विकून खाल्ले या लोकानी? आत्ता अजून एक करा....... ओंजल धरून उभे रहा त्यांच्या पुढे आणि म्हणाव थूंका याच्यात..... एवढे एकाच बाकी ठेवलय। तेही करतीलच म्हणा , सांगायची गरजच नाही त्याना .... लवकरच काना वर येइल अशी काही बातमी .............. लाज कशी वाटत नाही याना देव जाने....
संताप संताप होतोय जिवाचा...........
अत्यंत बेकार झालिये ही पोस्ट माहित्ये मला पण तिडीक गेली डोक्यात आणि लिहावसे वाटले म्हणून लिहिले.....
बाकी चूक भूल द्यावी घ्यावी