Saturday, February 28, 2009

My Birthday

उद्या माझा birthday आहे . आणि प्रचंड ऑफ़ आहे माझा मूड. दर वेळेला हे असच होत असते आणि तेही फक्त माझ्याच बाबतीत. जाम म्हणजे जामच चीड आलीये. आत्ताच माझ्या बेस्ट फ्रेंड चा फ़ोन येऊन गेला, तीनीच सुचवले ब्लॉग वर पोस्ट टाक म्हणजे ज़रा बर वाटेल. म्हणूनच हा पोस्ट प्रपंच.
तर उद्या आमच्याकडे सगळे आगंतुक गेस्ट येणार आहेत. आता अगदीच आगंतुक नाही म्हणता येणार कारण आमच्या आईनी सुध्हा वाटली आहेत गावभर आमंत्राने. ते येणार याचा प्रॉब्लम नाही आहे प्रॉब्लम आहे तो ते उद्या येणार आहेत याचा। उद्याचा दिवस माझा आहे न मग माझा दिवस मला साजरा करू द्यात की। दर वर्षीच नाटक आहे हे। माझ्या friendsना बोलवून , मझ्या मता प्रमाणे कधीच साजरा होत नाही माझा birthday।
एकवेळ नाही सेलिब्रेट केला तरी चालेल पण ही अशी नाटके नकोत. मी काही माणूसघाणी , कूचाकी ,खडूस नाही
पण माझाच birthday आणि दर वेळेला मीच दुखी हेच समीकरण ठरलेल असते.
आज आईला बर नाही म्हणजे उद्याचा स्वयंपाक मीच करणार ( आई करू नाही देणार तस् पण मलाच नाही बघवणार ) सो, मी करणार आणि तेही लोकांसाठी माझ्यासाठी नाहीच.
आई बाबा म्हणतात येतात प्रेमाने तर येउदेत , बाकी कोणाकडे थोडीच अशी नाती जपली जातात वैगरे पण च्यायला त्याचा ताप मला कशाला. नंतर जरी मी वाढदिवस मला हवा तसा साजरा केला तरी तो दिवस महत्वाचा नाही का?
जाउन्दे कित्तिही लिहल तरी माझा राग काही जाणार नाहिये. मग कशाला उगाच की बोर्ड बदवायाचा?
सवय झाली आहे आत्ता दर वर्षीचा १ मार्च असच साजरा करण्याची.....................................

Wednesday, February 18, 2009

दहावीचे वर्ष पार्ट 4

रिजल्ट लागून गेला तरी अजून माझ्या मागची पीड़ा काही संपली नव्हती। खरेतर रिजल्ट च्या आधी पासूनच admission चा घोळ सुरु होता पण तेव्हा admission पेक्षा रिजल्टच टेंशन जास्त होते आणि तेव्हा वाटले होते की हा गोंधळ रिजल्ट लागण्याच्या आधी संपेल सुद्धा, पण कसल काय गोंधळ तसाच कायम।
अरे हो गोंधळ कशाच्या बाबतीत ते सांगायचे राहीलच की। तर तो गोंधळ percentile पद्धतीचा । जे cbsc बोर्ड वाले असतात त्याना ssc बोर्ड वाल्यां पेक्षा नेहमीच जास्त मार्क्स मिळतात । म्हणून मग आमचे (म्हणजे ssc बोर्ड वाल्यांचे ) टक्के जास्त करणार। अर्थात काहीतरी पध्हत होती मार्क्स जास्त करण्याची। something like जे मेरिट rankers होते त्यांच्या मार्क्स ना १०० % धरून आमचे % काढायचे । पण cbsc बोर्ड चे पालक आणि शिक्षक obviously याच्या विरोधात होते। मग ते कोर्टात गेले। याचिका दाखल केली। हा एवढा घोळ कमी की काय म्हणून हे सगळे संपायच्या आतच दुसरा गोंधळ उभा केला सरकारने । जिल्हा qouta चा । म्हणजे जे जे ज्या ज्या जिल्ह्यात राहतात त्यानी त्याच जिल्ह्यातल्या collage मध्ये admission घ्यायची। मग ते collage कित्तीही भंगार का असेना । ( बर हा नियम होता २००४ च पण लागू मात्र नेमका आमच्याच वेळी केला ) ह्या सगळ्या गडबडिताच दोन लिस्ट लागून्ही गेल्या। मला ज्या collage मध्ये admission हवी होती तिथे नाव लागले नाही कारण मी त्या जिल्ह्यातली नव्हती।
मग पुन्हा जिल्हा qouta बद्दल पण कोर्टात गेले। याचिका दाखल केली। ती केस जिंकली पण आत्ता सगळ्या collages ना पहिल्या पासून लिस्ट लावत बसावे लागले असते। त्यात माझे ज्या (त्यातल्यात्यात ) चांगल्या collage मध्ये नाव लागले होते तेहि गेले असते। नशीब निदान त्या दोन लिस्ट cancel करणार नाही हा निर्णय सगळ्या collages नि सरकार च्या विरोधात जावून घेतला। पण मग पहिल्या दोन लिस्ट पेक्षा दुप्पट तिप्पट तीसरी आणि चौथी लिस्ट लागली। मला ज्या collage मध्ये admission हवे होते तिथे काही मला मिळाले नाही पण आत्ता दुसरी टांगती तलवार होती डोक्यावर। सगळ्या ssc बोर्ड वाल्यांच्या admission cancel करा असा निर्णय high कोर्टने दिला। नशीब आमच्या सुदैवाने (?????) असे काहीही झाले नाही।
आमच्या मनस्थितीची कल्पनाही करू शकत नाही कोणी । खूप काही सहन केलाय ह्या गोंधलात ।
तर मला काही हव्या त्या collage मध्ये admission नाही मिळाली ( आधीच ओपन category tyat ajoon ha gondhal ) nashibach phutake dusare kaay?????
aatta kalale na sarakar cha vilkshan gondhal mhanaje kaay?

Thursday, February 12, 2009

दहावीचे वर्ष पार्ट 3

परीक्षा संपायच्या आधीच ( actually जवळ जवळ सम्पूर्ण वर्षच ) एवढे प्लान्स केले होते न सुट्टी साठी , पण एकही सत्यात उतरला नाही। दहावीच्या सुट्टी एवढी एकही बोरिंग , irritating, आणि बकवास सुट्टी अनुभवली नव्हती। इतका वीट आला होता न या एवढ्या लांब लचक सुट्टीचा की वाटायचे यापेक्षा परीक्षेचे दिवस बरे होते।
एक तर जेव्हा आपल्याला वेळ आणि इच्छा असते न काही बघायची, तेव्हा t v वर ही काही चांगले नसते। परीक्षा सुरु होती तेव्हा TV वर एक सो एक movies लागायच्या आणि परिक्षे नंतर मात्र ना TV वर काही लागायचे ना FM वर काही चांगली गाणी लागायची। जाम म्हणजे जाम च पकायाला झाले होते।
त्यातून माझ्या बाबांची काकी गेली त्यामुले आमची टूर पण cancel झाली। बर मग दुसरया महिन्यात शिमल्याला जान्या साठी बुकिंग केले तर त्या गुज्जराना उत आला आणि आमचे तेहि जाने cancel। सरते शेवटी मला हैदराबाद च्या ३ दिवसांच्या short ट्रिप वर समाधान मानावे लागले।
असे करता करता रिजल्ट चा दिवस आला। त्याच्या आदली रात्र मी कधी विसरणार नाही। घरी माझे आई बाबानशी जोरदार वाजल। कशावरून ते आठवत नाहिये आत्ता पण प्रचंड चीड आली होती मला तेव्हा। पूर्ण रात्र जागली होती मी टेंशन मूले। शेवटी बरोबर ११ वाजता नेट लावले आणि रिजल्ट कलला आणि मोकले झाल्या सारख वाटले। पण तो दिवस पूर्ण अश्रू धालान्यताच गेला। सगल्या friends चे फ़ोन येत होते समजूत घालायला। बिचारी माझी बेस्ट फ्रेंड स्वताला अपेक्षे पेक्षा कमी मार्क्स मिळून ही माझे सांत्वन करत होती। घरी सगळे तसे नोर्मल होते पण मीच जरा अपसेट होती। ८५% वर commerce ला कुठेही admission मिळेल असे घरचांचे म्हानाने होते पण प्रश्न त्याचा नव्हताच मुळी प्रश्न होता तो अन्यायाचा। ज्यानी अत्ता आत्ताच दहावी दिली आहे त्याना पटेल माझे । खूप झोल असतो हो रिजल्ट मधे। ज्यांचे कधी नाव ही ऐकले नव्हते ते शालेतून पाहिले वैगरे आले होते आणि बिचारी जी मुलगी मान मोडून मेहनत करून दर वर्षी शालेतून पहिली यायची तिचे नाव ही नव्हते कुठे। काही लोकाना तर अक्षरशः jack पॉट्स लागले होते। खूप चीड आली होती तेव्हा। पेपर re चेकिंग ला देऊन काही होत नाही उलट bad luck जोरावर असेल तर मार्क्स कमी होतात म्हणे म्हणून मग पेपर्स re चेकिंग लाही नाही टाकले।
एकूणच काय तर तो जो काळ होता ना माझ्या साडे सातिचा होता। पुढे सरकारने जो काही गोंधळ घातला तो तर विलक्षण च होता। ते पुन्हा कधी तरी.........................

दहावीचे वर्ष पार्ट २

प्रीलिम्स चा रिजल्ट लागला तसे सगल्यांचेच भ्रमाचे भोपले फुटले। मला ८२ % होते त्यामुले घरी काही फारशी वाट नाही लागली पण ते ८२% फक्त माझे थोडेच होते? म्हणजे एक मेका सहाय्य करू तत्वावर परीक्षा झाल्याने............ जाउन्देत!!! तर आपण किती पाण्यात आहोत हे ज्याचे त्याला तरी नक्कीच कलले असावे कारण सगलेच नंतर करू, नंतर करू म्हणत साठवलेल्या अभ्यासाचा ढीग उपसत होते।
खरा अभ्यास झाला तो मात्र फक्त half जानेवारी आणि फेब्रुवारीत। त्यातूनही अध्ये मध्ये ओरल्स , practicals साठी शाळेत जाणे सुरु होत। मग त्या पाठोपाठ टाइम पास करणे, उगाच रेंगालाने इत्यादि इत्यादि हे आलेच।
फोटो काढाणे ,slam books भरून घेणे , भरून देणे, फ़ोन नंबर्स घेणे हेही सीरियसली चालू होते। खरेतर दहावीच्या स्ट्रेस मधून बाहेर येण्याचा तो उत्तम मार्ग होता ( अभ्यास करत नसलो म्हणून काय झाल टेंशन तर होताच न )
आणि ek dachaa तो परीक्षेचा दिवस उजाडला। वर्षभर टेंशन घेउन घेउन आता टेंशन च स्टॉक ही संपला होता त्यामुले (निर्लज्ज पणे ) मी आदल्या दिवशी जब वी मेट बघत बसले होते। दुसरया दिवशी सगळे सह कुटुंब सह परिवार मला सेंटर वर सोडायला आले होते। पहिला पेपर मराठीचा होता। हा "शकुनाचा" पहिला पेपर च थोडासा राहीला। त्या मुले जाम ऑफ़ झाला होता मूड। पुढचे सगळे पेपर तसे छान गेले । संस्कृत ला पुन्हा बोम्ब लागली। त्याचे काय झाले की ह्या पेपर च्या आधी ७ दिवस लागोपाठ सुट्टी आली। मग अजून ६ दिवस आहेत , नंतर करू। अजून ५ दिवस आहेत , असे करत करत पेपर चा दिवस आला आणि मग आमचे डोळे खड कन ughadale. मग सकाळी सकाळी ( ९.३० वाजता) उठून थोड़े व्याकरण बघितले। आणि मग अत्ता जे होइल ते होइल ( जो बोले सो निहाल) म्हणून पेपर द्यायला गेले। बाहेर आल्यावर एक एक जन जो उड़त होता न ढगात ते बघून तर अजूनच टेंशन आल । तसा बरा गेला होता पेपर मला म्हणजे निदान व्याकरण तरी नीट आल होते पण इतरांचा उत्साह पाहून जरा भीती वाटत होती।
भूगोलाच्या पेपराला मी नेहमी प्रमाणे घोळ घातलाच। नकाशे आणि ग्राफ पेपर वर प्रश्न क्रमांक च नाही घातले मग त्या सुपर viser ना जरा मस्का लावला ( तरी नशीब ते सर होते एखादी बाई वैगरे असती तर जाम नाटके केली असती।) आणि मिलवला बाबा पेपर परत एकदाचा।
सो, अशी हज्जार नाटके, तमाशे पार पाडून आमची परीक्षा संपली।
हुश , लिहून लिहून दमली मी; बाकी सुट्टी, रिजल्ट आणि admission नंतर कधी तरी। बाय then.........

Monday, February 2, 2009

दहावीचे वर्ष

आत्ता मध्यंतरी दहावीचे टाइम टेबल लागले आणि आम्हाला आमच्या दहावीच्या वर्षाची आठवण झाली। (मी हे असे बोलते की जणू मी दहावी देऊन वीस पंचवीस वर्षे लोटली ।) means actually सांगायचे झाले तर मागच्या वर्षीची आठवण झाली. काय जबर धमाल केलेली आम्ही ।
म्हणजे नाही म्हणायला मी तशी सुरुवातीला थोडी थोडी serious झाले होते अभ्यासाबाबत पण हे सगळे फक्त एखाद दोन महिन्यां साठीच । नंतर तर वर्षभर कधी सीरियसली अभ्यास केलाच नाही। नुसता टाइम पास सुरु असायचा। एक तर नविन अभ्यास क्रम, नविन परीक्षा पद्धत ,orals, mathsआणि social studies साथी assignments आणि average marking सगळे आमच्याच नशिबी यायचे होते। पण निदान त्यामुले का होइना थोड़े tension तरी घेतले होते अभ्यासाचे । पण नव्याचे रंग ९ दिवस
वर्षभर उनाडक्या केल्या आणि मग वर्षाच्या शेवटीएकदाची अभ्यासाची आठवण झाली। पण prelims साठी मात्र शिस्तीत अभ्यास केला।
ती सगळी मजा शब्दात मांडणेही शक्य नाही पण खरच दहावीचे वर्ष सगळ्यात मस्तीचे गेले. शाला सोडताना खूप वाईट वाटले। उगाच सगल्या टीचर्स ना त्रास देने। ज्याना जे आवडत नाही त्यांच्या समोर मुद्दाम तेच कराने, कलात्मक रित्या सगल्या शिक्षकांची चित्र काढने। शाला सुतल्या नंतरही उगाच शाळेत रेंगाळत रहाणे। प्रत्येक परीक्षेचा प्रत्येक पेपर दिल्यानंतर ice cream खाऊन celebration करणे । काहीही कारण नसताना हसत बसणे। कित्ती तरी फालतू फालतू गोष्टिताही मजा शोधयचो। आत्ता आठवले तरी खूप refreshing वाटते ।
तर दहवीच वर्ष part २ म्हणजे बोर्डाची परीक्षा आणि result वैगरे पुन्हा कधी तरी। see you then bay............